शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

✍️ *अविस्मरणीय ग्रेट भेट...* 🫱🏻‍🫲🏿

✍️ *अविस्मरणीय ग्रेट भेट...* 🫱🏻‍🫲🏿
         🥀🥀🥀🥀🥀
     दिनांक 01 नोव्हेंबर 2022 रोजी संघटनेच्या कामानिमित्त मी व माझे सहकारी चालक विनोद पाटील मुंबई मध्यवर्ती कार्यालय आलो होतो. मी एस.टी. मध्ये रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत कोणत्याच VCMD यांना कधीही भेटलो नव्हतो तसा योगही आला नव्हता. मात्र मान्यताप्राप्त संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष *संदीप दादा शिंदे* यांच्यामार्फत मला त्यांची भेट घेण्याचा अविस्मरणीय योग आला..
      *एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा.श्री. शेखर चन्ने साहेब* यांचा मृदू, शांत, संयमी अभ्यासू स्वभाव अनुभवास आला. माझ्यासारख्या सामान्य वाहकाकडून एस.टी.बद्दलचे त्यांनी विचार ऐकुन घेतले, विविध समस्या व एस.टी.चे उत्पन्न वाढविण्याबाबत नेमक्या कशा व कोणत्या उपाययोजना करण्यात येतील त्याबाबत सविस्तर चर्चा त्यांनी केली याचे समाधान मला वाटले.

  ✸ आमच्या जळगाव विभागामधील कर्मचाऱ्यांना सध्या ETIM मशीन बाबत खूप समस्या येत आहेत. ज्या नादुरुस्त मशीन होत्या त्या स्वखर्चाने दुरुस्त करून दिवाळी सणामध्ये उत्पन्न वाढीसाठी वाहकांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी लवकरच नवीन मशीन जळगांव विभागाला देण्यात येतील तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी विपरीत परिस्थितीत उत्पन्न वाढीसाठी जे मनापासून केले त्यांचे अभिनंदन व पुढेही उत्पन्न वाढीचा फ्लो असाच सुरू ठेवतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली.

✸ *उत्पन्न वाढीबाबत...*
       या मुद्यावर चर्चा करताना त्यांना एस.टी.महामंडळाने जुनी 10% सवलत योजना बंद केली होती ती परत सुरू केली तर नवीन तरुण  नोकरदार वर्ग, विविध क्षेत्रातील कामगार हे प्रवास करण्यासाठी एस.टी.ला प्रथम  प्राधान्य देतील परिणामी रोख उत्पन महामंडळाचे वाढेल असे सुचविले यावर गांभर्याने विचार करू असे त्यांनी आश्र्वशित केले.
      एस.टी.महामंडळाचे रोख उत्पन्न वाढले तर एस.टी.नफ्यात यायला जास्त काळ लागणार नाही त्यामुळे याबाबत विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी लक्षवेधी सूचनाही माझ्याकडुन मांडली आहे. एस.टी.कर्मचाऱ्यांना जागृत करण्यासाठी तसेच प्रवाशांना एस.टी. कडे आकर्षित करण्यासाठी मी जो *"एस.टी.कर्मचारी मार्गदर्शक" ब्लॉग* तयार केला होता त्याचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.

      *माझ्यासारख्या सामान्य वाहकाला वेळ देऊन त्यांनी चर्चा केली याबद्दल VCMD मा.चन्ने साहेब व आमच्या  संघटनेचे आशास्थान केंद्रीय अध्यक्ष संदीप दादा शिंदे यांचे खुप खुप आभार व धन्यवाद!*
🌹💐🎊🙏🥀

✍️ *नितीन बागले वाहक अमळनेर आगार* 🙏

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

चालक- वाहक यांना यांना कामगिरी न मिळाल्यास किंवा रद्द झाल्याने त्या दिवसाची हजेरी देणेबाबत

दैनंदिन कामगिरीवर हजर राहून सुद्धा चालक-वाहक यांना दिवस भरून दिला जात नव्हता.... याबाबत मान्यताप्राप्त संघटनेने दखल घेतली व उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे तक्रार केली.
यावर महाव्यवस्थापक (क.व.औ.स.) श्री.अजित गायकवाड यांनी आज दिनांक 26.09.2022 रोजी अधिकृत पत्र काढून दिवस भरून देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना : 75 वर्षांवरील नागरिकांचा मोफत प्रवास

 ज्येष्ठ नागरिक योजना : 75 वर्षांवरील नागरिकांचा मोफत प्रवास

  1. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेला गेल्या शुक्रवारपासून (ता. २६) सुरुवात झाली.
  2. या योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देतील. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस टीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठी देखील लागू असणार आहे,असे व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी प्रास्ताविकात सांगितले.
  3. आता ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजनेचा फायदा मिळायला सुरूवात झाली. यामुळे ज्येष्ठांना मोठा आधार मिळाला आहे.
  4. “७५ वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास सवलतीची अंमलबजावणी केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासादरम्यान आधार, पॅन, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, केंद्र, राज्य शासनातर्फे देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत लागू आहे.”
  5. सवलत योजनेची वैशिष्ट्ये: वातानुकुलीत, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये 50 टक्के सवलत मिळत आहे. आता वातानुकुलीत, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी सेवांनाही ही सवलत लागू होणार आहे.
  6. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येईल.
   परिपत्रक 👇
     

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

गाडी नादुरुस्त झाली असता अथवा येण्यास उशीर झाला असता करावयाच्या मदतीसंबंधी व्यवस्था

 गाडी नादुरुस्त झाली असता अथवा येण्यास उशिर झाला असता करावयाच्या मदतीसंबंधी व्यवस्था

▫️◽▫️◽▫️▫️◽◽▫️▫️◽◽▫️▫️◽▫️◽◽▫️▫️◽▫️▫️▫️◽◽

राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाडया विविध मार्गावर धावत असतात . ज्या गाडीत यांत्रिक बिघाड होतो त्यास " गाडी नादुरुस्त झाली असे म्हणतात.

 सर्वसाधारणपणे बस मधील डिझेल संपणे , एअर लॉक होणे , टायर फुटणे , पंक्चर होणे , फेक्झीबल पाईप तुटणे , फॅन बेल्ट तुटणे , जॉईन्टचे नट तुटणे , अॅक्सलचे नट तुटणे , अॅक्सल बाहेर येणे , साईलेंसर पाईप तुटणे , क्लचप्लेट निकामी होणे , क्राऊन पिनियन जाणे , गिअर बॉक्स मध्ये आवाज येणे , पिन बाहेर येणे इ . विविध कारणानी बस नादुरुस्त होऊ शकते . गाडी किरकोळ स्वरुपाच्या दोषामुळे नादुरुस्त झाली असल्यास उदा . फॅन बेल्ट बदलणे , टायर पंक्चर काढणे , ओअर लॉक काढणे , इ . दुरुस्त्या चालक / वाहकानीच करावयाच्या असतात . सदरच्या दुरुस्त्या किंवा ज्या दुरुस्त्या गाडीचे विश्रांतीच्या काळात केल्या जातात त्यावेळी ती नादुरुस्ती वाहन बिघाडात येत नाही . मात्र इतर दुरुस्त्या , ज्या चालक / वाहकाचे आवाक्या बाहेरच्या असतील , अशावेळी चालकानी वाहकाच्या मदतीने शक्य तो रस्त्याच्या कडेला बस उभी करून ठेवावी . बस नादुरुस्त कारणांची नोंद लॉगशिटवर नोंदवून बिघाड दूर करण्यासाठी कोणत्या हत्यांराची / साधनसामुग्रीची जरुरी आहे याबद्दल नेमकी माहिती वाहकाच्या मदतीने लि हून घेऊन ब्रेकडाऊन रीपोर्ट तयार करावा व त्या मार्गावरुन येणाऱ्या रा.प. बसच्या चालक / वाहकाबरोबर जवळच्या आगारात पाठवून द्यावा . आवश्यकता वाटल्यास रिलीफ बसची व्यवस्था करण्याबाबत कळवावे . अर्धा तासपर्यंत बस दुरुस्त न झाल्यास तसेच रिलीफ बस न आल्यास , मागाहून येणाऱ्या रा.प.बसने

प्रवाशांना त्यांचे इच्छित स्थळी पाठवून द्यावे . ज्या प्रवाशांना प्रवास करावयाचा नसेल त्यांना परतावा रक्कम हवी असल्यास झालेल्या प्रवास भाड्याचे पैसे वळते करून राहिलेल्या रक्कमेचा परतावा द्यावा . मात्र आवश्यक त्या नोंदी मार्गपत्रकावर करून तिकीटे मागून घेऊन ती रा.प.रकमेचा भरणा करताना सोबत जोडावीत . एखादी गाडी नादुरुस्त झाल्यास लेखी / तोंडी रिपोर्ट जेव्हा वाहतूक नियंत्रकाकडे येतो किंवा प्रत्यक्ष येऊन सांगितला जातो , तेव्हा वाहतूक नियंत्रकाने ब्रेकडाऊन फॉर्म भरून आगार कार्यशाळेत पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा . गाडीचा असेल की , त्यामुळे गाडी पुढील मार्गावर धावूच शकणार नाही अशावेळी त्वरीत रिलीफ गाडीची व्यवस्था करण्यात यांत्रिक बिघाड असा यावी . ब्रेकडाऊन रिपोर्ट आगार शाळेत प्राप्त झाल्यावर तो ब्रेकडाऊन अटेंड करण्यासाठी ज्या हत्यारांची / साधनांची जरुरी असेल ते साहित्य त्वरीत गोळा करून कुशल यांत्रिक कर्मचाऱ्यांस ब्रेकडाऊनसाठी पाठवावे . ब्रेकडाऊन अटेंड केल्यावर केलेल्या दुरुस्तीच्या नोंदी लॉगशिटवर कराव्यात . जर त्या गाडीतील प्रवाशांची इतर गाड्यातून पुढे पाठविण्याची व्यवस्था झालेली नसेल तर बरोबर आणलेली गाडी पुढचे प्रवासासाठी द्यावी . व ब्रेकडाऊन गाडीची दुरुस्ती करून ती आगारात आणावी . यास रिपोर्टेड ब्रेकडाऊन म्हणतात . 

एखादी गाडी नियोजित वेळेपेक्षा एक तास होऊनही आली नाही अशावेळी कामगिरीवरील वाहतूक नियंत्रकानी त्या मार्गावरून येणाऱ्या गाड्यांचे चालक / वाहक तसेच इतर वाहन चालकाकडे चौकशी करावी . काहीच माहिती उपलब्ध न झाल्यास ती गाडी ब्रेकडाऊन झाली असल्याबाबतची माहिती आगार कार्यशाळेत कळवावी , प्रवाशांना कल्पना द्यावी . कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी गाडीच्या बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी सदर गाडीच्या मागील काही दिवसांच्या डिफेक्ट स्लिपा पाहून अंदाज करावा व त्यानुसार ब्रेकडाऊन साहित्य घेऊन त्या गाडीचे येण्याचे मार्गाने निघावे व गाडीचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करावी .