बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

🇪🇸 *वाढदिवस एका असामान्य युवा नेतृत्वाचा

🎂💐🌹🙏

🇪🇸 *वाढदिवस एका असामान्य युवा नेतृत्वाचा*🇪🇸
  *-२३ अॉगस्ट*


    *करे अल्पज्ञानी बहु* 
     *जसा निजनतेच्याअति खळखळाट॥* 
*असे पुर्णज्ञानी कमी बोलणारा।  विना नाद वाहे जशी गंगाधारा॥*

     कामगार चळवळीत अनेक प्रकारचे कामगार नेते असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा *गंगाधारेसारखे संत वहात* अवघा महाराष्ट्र *चिंब* करणारा एक कामगार नेता जर कोण असेल तर, ते *मा.संदिपभाऊ शिंदे* होय. शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून संदिपभाऊ यांचे सर्वसामान्य एसटी कर्मचार्यांत नावलौकिक आहे.      कामगारहितार्थ निर्णय,पार्दर्शक कारभार, कर्तव्यदक्ष, कामगारसंग्रह, संघटनेसाठी केलेले काम आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्यसंपन्नता लाभलेले एक असामान्य नेतृत्व म्हणजेच मा.संदिपभाऊ शिंदे होय. कामगार चळवळीस व्यक्तीमत्वासाठी लागणार्‍या पट्टीतील या अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव,कामगारसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे *खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते* नेते म्हणजे संदिपभाऊ शिंदे होय.
   दुरदृष्टीने झपाटुन काम करणारं गतिमान नेतृत्व! त्यांच्यासोबत काम करतांना वेगळीच उर्जा मिळते. त्यांनी जेंव्हा पासुन संघटनेची जबाबदारी स्विकारली आहे, त्या प्रत्येक जबाबदारीत सतत जागृत असणार नेतृत्व संदिपभाऊ यांच्यात पाहावयास मिळाले. दादांबरोबर काम करतांना अनेक अनुभव मिळाले, मार्गदर्शन मिळाले. आगाराच्या, विभागाच्या व राज्याच्या कर्मचार्यांच्या समस्या जाणणारा नेता म्हणुन दादांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. कोणतेही काम हातात घेतांना, सुरु करतांना होणारे *फायदे-तोटे, दुरगामी परिणाम* यांचा विचार करुन सखोल अभ्यास करुन कामास सुरुवात करण्याची *खास हातोटी* दादांकडे आहे. याचा अनुभव मी खुप जवळुन घेतला आहे.
      संदिपभाऊ यांनी कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांवर समस्येवर आवाज उठवुन न्याय दिला आहे. कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार्‍या, कामगार हितासाठी राजकारण, युनियन भेदभाव न करता प्रत्येक घटकाचे प्रश्‍न सोडवणार्‍या, कामगार क्रांती करुन कामगारांवर होणार्या अन्यायाला आळा घालणार्‍या या कामगार नेतृत्वाने कर्मचार्यांच्या ह्रदय सिंहासनावर अढळ स्थान निर्माण केले आहे. या असामान्य नेतृत्वाचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्याचा *छोटासा आढावा...*

    🖊 संदिपभाऊ यांच्या केंद्रिय अध्यक्ष रुपाने मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेला २०१५ साली प्रभावी नेतृत्व लाभले आणि कामगार संघटनेला एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली. आगार सचिव ते केंद्रिय अध्यक्ष अशी अनेक पदांच्या आपल्या कार्यकर्तृत्वाने नावलौकिक वाढवणार्‍या संदिपभाऊ यांनी कामगार संघटनेचा कायापालट केला. भाऊ फाटक यांच्या स्वर्गवासा नंतर कामगार संघटना आपल्या विकासाभिमुख नेतृत्वाला पारखा झाला. स्व. भाऊ फाटकांनंतर कामगार संघटनेची सुरु झालेली कामगार चळवळ अविरत सुरु ठेवण्याची जबाबदारी आता या घडीला मा.संदिपभाऊ यांच्यावर आली आहे. *जुन्या, जेष्ठ कार्यकर्त्यांच्यासोबत नवीन युवा कार्यकर्त्यांची मोट बांधून* कामगार संघटनेचा विकासाचा झंजावात सुरु केला. अल्पावधीतच मा.संदिपभाऊनी कामगार चळवळीच्या पटलावर आपले नाव कोरले. *स्व.भाऊ फाटक साहेबांची उणीव मा.संदिपभाऊ शिंदे हे लवकर भरुन काढतील अशी आशा निर्माण झाली आहे.*

      संदिपभाऊ यांनी एसटी कामगार संघटनेची महत्वकांक्षी *सातवा वेतन आयोगाची मागणी मार्गी लावली आहे.*
  एसटी कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगाच्या *२.५७ या सुत्रानुसार* पगारवाढ मिळाली याचे सर्व श्रेय मा.संदिपभाऊ यांना जाते. *होऊ घातलेल्या* कामगार करारात नॉन फायनॅनशियल मुद्द्यातील बर्याच *कामगार हिताच्या मागण्या* संदिपभाऊ यांच्या अथक परिश्रमाने मंजुर करुन घेतल्या आहेत. तसेच एसटी कर्मचारी व शासकिय कर्मचारी यांच्यामधील तफावत दुर करण्यासाठी ग्रेड पे मिळविण्यासाठी संघटनेने मान्यता पणाला लावली आहे. *एका बाजुला न्यायालयीन लढाई तर दसर्या बाजुने संपाचे हत्यार उगारुन ग्रेड पे मिळवणारच असा आक्रम पवित्रा केवळ संदिपभाऊ असल्यामुळे संघटना घेत आहे हे कर्मचार्यांनी विसरता कामा नये.*

       मा.संदिपभाऊ आणि कामगारांचे प्रेम आणि जिव्हाळा एवढा वाढला की, संघटनेचा सामान्य कार्यकर्ताच नव्हे तर अगदी सामान्य कर्मचारी संदिपभाऊ यांच्याशी *थेट संपर्क* साधू लागला.त्यामुळे आपोआपच ऋणानुबंध वाढत गेला आणि संदिपभाऊ हे आपल्या घरातीलच एक सदस्य आहेत, अशी सर्वसामान्य कर्मचार्यांमध्ये वाढीस लागली. सुरुवातीला विवाह सोहळ्याला उपस्थित राहणारे दादा कोणताही भेदभाव न ठेवता कोणत्याही युनियनच्या कर्मचार्यांच्या प्रत्येक सुख- दुख:त सहभागी होवू लागले आणि त्यामुळे सर्वसामान्य कामगारांशी त्यांचे *घनिष्ठ ऋणानुबंध* निर्माण झाले. कामगारांनी वेळोवेळी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवून संदिपभाऊ यांनी आपली जबाबदारी नेहमीच पार पाडली आहे. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे मा.संदिपभाऊ यांनी सर्व युनियनच्या *कार्यकर्त्यांना भूरळ* घातली. आगार सचिव, विभागिय अध्यक्ष- सचिव, केंद्रिय कार्यकारणीमध्ये संदिपभाऊ  यांनी *विविध पदांवर सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांनाही संधी दिली आहे.* संदिपभाऊ यांच्या *निस्वार्थी* स्वभावामुळे हजारो कार्यकर्ते त्यांच्याशी *मनाने जोडले* गेले आहेत. केवळ कार्यकर्त्यांची फौज सोबत मिरवणार्‍या दिखाऊ नेतृत्वाला दादांनी  एक आदर्श घालून दिला आहे. कार्यकर्त्यांना केवळ फिरवण्यापेक्षा त्यांना न्याय मिळाला पाहिजे, कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, हीच भुमिका दादांची असल्याचे अनेक उदाहरणांवरुन स्पष्ट होते.


🎙 *उत्तल वक्तृत्व कुशलनेतृत्व आणि संघटन कौशल्याचे संदिपदादा..*🎤 

  कोणत्याही सभेत त्यांचे भाषण सुरु झाले की विरोधकांचा काळजाचा ठोका हमकास चुकतो *इतकं स्पष्ट आणि पुराव्यासाहित ते एखाद्या प्रकरणाची चिरफाड करतात.* सामान्य कर्मचारी एखादे काम दादांकडे घेऊन गेल्यास ते एखाद्या अधिकार्याला वाकवू शकतात हि खात्री सर्वसामान्य कर्मचार्यांना पटू लागली आणि दादांच्या कार्यालयात ह्या जुलमी प्रशासना विरोधात गाऱ्हाणी मांडायला कर्मचारी येऊ लागली, दादाही त्या सर्वांच्या समस्या जातीने समजावून घेऊन स्वतःची समस्या असल्यासारखे त्यात लक्ष घालतात आणि ती मार्गी लावतात, अशाप्रकारे हे नेतृत्व हळू हळू संबंध महाराष्ट्रच्या एसटी कामगारांच्या संपर्कात जात आहे. दादांची खासियत म्हणजे त्यांचे *वक्तृत्व* होय.  *एखाद्या दगडाला देखील पाझर फुटेल इतके त्यांचे वक्तृत्व प्रभावशाली.* कुठलाही कार्यक्रम असला की प्रत्येक कार्यकर्ता दादांची सभा घ्या असा आग्रह करतात.
   कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घराण्यात जन्म घेतलेल्या दादांना केंद्रिय अध्यक्ष पद काही वशिलेबाजी ने मिळाले नाही, *ते त्यांनी मिळवले स्वकर्तृत्वानेच…!*
म्हणतात ना जर तुमच्यात दम असेल कर्तृत्व असेल आणि तुमची नाळ सर्वसामान्य कर्मचार्यांशी जुळलेली असेल तर राजकारणात तुम्हाला मोठं होण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे संदिपभाऊ यांच्याकडे पाहिल्यास समजते.

  📌  *समस्थ कामगार वर्गाचे लाडके नेते व प्रेरणास्थान,*

 📌 *कर्मचार्यांच्या समस्येसाठी सदैव तत्पर व नेहमीच युवकांसाठी वेळ देणारे,*

📌 *गरजेच्या वेळी भावासारखे आमच्या पाठिशी उभे राहणारे,*

 *कामगार संघटनेचे सक्रिय युवा नेते सर्वांचे लाडके आदरणीय मा.संदिपभाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस.*
*त्यांना वाढदिवसानिम्मित मनःपूर्वक शुभेच्छा!*
🎂💐🙏

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 *भविष्यात आपले नेतृत्व अधिकच बहरत जाऊन शोषितांच्या , पीडितांच्या कामी येऊ एवढीच अपेक्षा.*

 *धन्यवाद !*


✍ *नितिन बागले, चोपडा आगार*✍

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

मदतनीस पदातील कर्मचाऱ्यांना सहाय्यक कारागीर पदाची निवड श्रेणी

🚌🔨🔧🔌

 *मदतनीस पदातील कर्मचाऱ्यांना सहाय्यक कारागीर पदाची निवड श्रेणी-*
     मदतनीस आयटीआय पास असेल तर समय श्रेणीपासून पाच वर्षांनी सदरची श्रेणी अनुज्ञेय आहे. व आयटीआय नसेल तर समय श्रेणीपासून सात वर्षांनी निवड श्रेणी अनुज्ञेय आहे.
 *अटी-* *१.* निवड श्रेणी पात्र तारखेच्या पाच वर्षात १३०० दिवस आवश्यक. सदर पाच वर्षात तेराशे हजार दिवस पूर्ण न झाल्यास ज्या तारखेला १३०० दिवस पूर्ण होतील त्या तारखेपासून निवडश्रेणीत पात्र.
*२.* व्यावसायिक चाचणी परीक्षा/ खात्यामार्फत बढती परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

(२) *सहाय्यक कारागीर पदातील कार्यशाळा कर्मचाऱ्यांना कारागीर "क" पदाची निवड श्रेणी-*
   सदरची निवड श्रेणी सहाय्यक कारागीर पदातील नियमित बढती मिळाल्यानंतर आठ वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर अनुज्ञेय आहे.

*अटी-* *१.* निवड श्रेणी पात्र तारखे पूर्वीच्या ५ वर्षात १३०० दिवस आवश्यक सदर ५ वर्षात १३०० दिवस पूर्ण न झाल्यास ज्या तारखेला १३०० हजार दिवस पूर्ण होतील त्या निवड श्रेणीत पात्र.
*२.* व्यावसायिक चाचणी परीक्षा/ खात्यामार्फत भरती परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
*३.*  मदतनीस पदातील कर्मचाऱ्यांना सहाय्यक कारागीर पदातील निवड श्रेणी मंजूर करताना अथवा सहाय्यक कारागीर पदातील कर्मचाऱ्यांना कारागीर "क" पदातील निवड श्रेणी मंजूर करताना त्या पदात निवड श्रेणी मिळण्यापूर्वी नियमित बढती मिळाल्यास निवड श्रेणी देता येत नाही.
*४.* मदतनीस किंवा सायक कारागीर हे निवड श्रेणी पात्र पदातील व्यावसायिक चाचणी परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झाले नाहीत तर ज्या वेळी ते व्यवसायिक चाचणी परीक्षा पास होतील त्या तारखेपासून निवड श्रेणी मंजूर करण्यात येते परंतु व्यवसायिक चाचणी परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झाल्यास पात्र तारखेपासून निवड श्रेणी देता येते परीक्षा पास झाल्याची तारीख विचारात घेतली जात नाही (परिपत्रक क्रमांक पीडीसी नंबर ७०/८०दि.२६.१२.१९८०) वेतन निश्चिती जी.एस.ओ.क्र. ९९० प्रमाणे करण्यात येते.
  वाहक, कारागीर क, प्रमुख कारागीर, प्रशासकीय कर्मचारी यांना नियमित तारखेपासून बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवड श्रेणी देता येते.
 *संदर्भ-* (१.) करार १९८८ (२.) पीडीसी परिपत्रक क्र.२ दि.१६.०९.१९८३  (३.) पीडीसी परिपत्रक क्र.२ दि.२५.०५.१९८४ (४.) करार दि.०१.०४.१९८४ पत्र क्र एसटी/एसीसी/जनरल/करार/९६९९, दि.१६.१०.१९८५

  *अटी-* १. निवड श्रेणी पात्र तारखे पूर्वीच्या ३ वर्षांमध्ये ७२० हजर दिवसांची उपस्थिती आवश्यक.
 २. निवड श्रेणी पात्र तारखेपूर्वी ७२० हजर दिवस पूर्ण केले तरी निवड श्रेणी मात्र तारखेपासूनच देता येते.
 ३. निवड श्रेणी पात्र तारखेपूर्वी ७२० हजर दिवस पूर्ण न केल्यास ज्या तारखेला ७२० हजर दिवस पूर्ण होतील ती तारीख निवड श्रेणी ची तारीख समजण्यात येते.
४.  प्रत्येक वर्षात सरासरी २४० हजर दिवस आवश्यक.

   ➖  *वाहकाला वाहतूक नियंत्रक पदाची निवड श्रेणी दिली जाते.*

➖ *कारागीर "क" -- प्रमुख कारागीर पदाची निवड श्रेणी दिली जाते.*

➖ *लेखनिक-- कनिष्ठ सहाय्यक पदाची निवड श्रेणी दिली जाते.*

 ➖*प्रमुख कारागीर-- प्रभारक पदाची निवड श्रेणी दिली जाते.*

➖ *कनिष्ठ सहाय्यक-- आस्थापना पर्यवेक्षक/ वरिष्ठ सहाय्यक पदाची निवड श्रेणी दिली जाते.*
 

✍ *संकलन- नितिन बागले, चोपडा आगार*
_अधिक माहितीसाठी-_ https://nitinmbagale.blogspot.com/?m=1


🙏🙏🙏🙏