सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

कोणताही अर्ज कार्यालयात दिल्यानंतर त्याची पोच घेणे महत्त्वाचे आहे..

कोणताही अर्ज कार्यालयात दिल्यानंतर त्याची पोच घेणे महत्वाचे आहे. 

पोच कशी घ्यावी
अर्ज व्यवस्थित लिहून झाल्यावर त्याची झेरॉक्स करावी. जवळपास झेरॉक्स नसेल तर कोऱ्या  कागदावर कार्बन पेपर ठेवून त्यावर दुसरा कोरा कागद ठेवून टाचणीने फीट करावा व मग अर्ज लिहावा.

ओरिजिनल (मुल प्रत) अर्ज कार्यालयास द्यावी. कोणत्याही कार्यालयात बारनिशी विभाग असतो. त्या बारनिशी विभागात जावून झेरोक्स कागदावर बारनिशी विभागाचा सही  शिक्का घ्यावा.

अर्ज देण्याच्या दोन पद्धती आहेत.

१.  अर्ज प्रत्यक्ष अधिकाऱ्याचा  हातात देवून त्याचेकडून किंवा बारनिशी विभागातून पोच घेणे.
२. अर्ज बारनिशीत देवून त्याची पोच घेणे.

कार्यालय दूर असेल व तिथे जाने शक्य नसेल तर अर्ज रजिष्टर पोष्टाने पाठवावा. पाठवण्यापूर्वी अर्जाची झेरॉक्स करावी. पोच पोष्टाने येते. ती पोच पावती अर्जाला टाचनीने जोडून ठेवावी.

बऱ्याचदा अर्ज स्वीकारताना पोच मागितली असता, 'साहेब बाहेर गेलेत/ संध्याकाळी पोच मिळेल', 'बारनिशी तील शिपाई बाहेर गेलाय २ तासाने परत या' अशी वाट्टेल ती उत्तरे लबाड सरकारी कर्मचारी देतील. व तुम्हाला वाटेला लावतील त्यांच्या भूलाथापांना बळी पडू नका. 'मला पोच द्या, पोच मिळेपर्यंत मी इथून जाणार नाही.' अशी ताठर भूमिका घ्या. मगच पोच मिळेल.

अत्यंत महत्वाचे 

पोच घेतली नाही तर तुमचा अर्ज १०० % कचऱ्याच पेटीत जाणार आहे हे लक्षात असू द्या.

काही ठिकाणी अर्ज सादर केल्यावर टोकण मिळते. ते टोकण अर्जाच्या झेरॉक्सला चिकटवा. व पोच पावती, टोकण, अर्जाची झेरॉक्स फाईलला व्यवस्थित लावून ठेवा

 संकलन- नितिन बागले, चोपडा आगार

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

*कर्मचारी भविष्य निर्वाह निधी*
➖➖➖➖➖➖➖➖
कामगार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हे नाव आपण बरेच वेळा ऐकले असेल परंतु याबाबत संक्षिप्त स्वरूपात माहिती नसेल म्हणून माझ्या अध्यायनातुन आपल्या कर्मचारी बांधवास एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
🔹कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ साली अंमलात आला.त्या अनुषंगाने केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मंडळाची स्थापना करण्यात आली.
🔹आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा मध्ये स्वतंत्र विश्वस्त मंडळा मार्फत कामकाज केल्या जाते.
🔹employee provident fund (EPF)-यालाच मराठीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी असे म्हणतो.सदरच्या खात्यात कर्मचारी यांच्या मासिक वेतनातुन *(फक्त मूळवेतन+महागाई भत्ता)* १२% रक्कम कपात करून EPF च्या खात्यात समाविष्ट करण्यात येते.तसेच यात मालका कडून ३.६७% रक्कम समाविष्ट करण्यात येते.म्हणजे आपल्या EPF खात्यात दरमहा १५.६७% रक्कम जमा होत असते.विश्वस्त मंडळा कडून फक्त याच रकम्मेवर व्याज दिल्या जाते त्यामुळे सेवानिवृत्ती नंतर EPF चा पैसा जास्त मिळतो.
🔹employee pension scheme (EPS)-याला मराठीत कर्मचारी पेंशन योजना म्हटले जाते.या खात्यात कर्मचारी यांच्या वेतनातुन कोणत्याही प्रकारची रक्कम जमा होत नाही.उलट मालका कडून कर्मचाऱ्याच्या मासिक वेतन (मूळवेतन+महागाई भत्ता) याचे ८.३३% रक्कम जमा केली जाते.याच आधारावर आपली मासिक पेंशन किती असायला हवी हे ठरते.
👉🏻सप्टेंबर २०१४ पूर्वी मूळवेतन+महागाई भत्ता याची अधिकतम मर्यादा ६५००/- (दरमहा-५४२/-) होती.त्यात सप्टेंबर २०१४ पासून वाढ करण्यात आली असून अधिकतम मर्यादा १५०००/- (दरमहा-१२५०/-) करण्यात आली आहे.
👉🏻या योजनेमुळे पेंशन कमीत-कमी १०००/- ते जास्तीत-जास्त ७५००/- मिळते.
👉🏻या योजने करीता ६ महिन्या वरील कालावधी १ वर्ष म्हणून गणला जातो तर ६ महिन्या आतील कालावधी ० वर्ष म्हणून गणला जातो.
👉🏻या योजनेचा लाभ मिळविन्या करीता कमीत-कमी १० वर्ष सेवा होणे बंधनकारक आहे तर जास्तीत-जास्त ३५ वर्ष.
👉🏻१० वर्षा पेक्षा कमी सेवा असल्यास पेंशन योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु जमा असलेली रक्कम काढून घेता येते.
👉🏻या योजनेला व्याज मिळत नाही.
*👉🏻सूत्र-सरासरी वेतन×सेवा वर्ष÷७०=दरमहा मासिक पेंशन.*
🔹employee direct life insurance (EDLI)-यात मालकाला ०.५०% रक्कम समाविष्ट करावी लागते.
🔹administration charges-यात मालकास ०.६५% रक्कम समाविष्ट करावी लागते.
*सदरच्या खात्यात दरमहा कर्मचारी १२%+मालक १३.१५%=२५.१५% जमा होत असतात.*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
          *विकास डुबुले*
  *रा.प.मंगरूळपिर आगार*