📌 कामगार मित्रांनो भावनेच्या जगातून बाहेर या वास्तविकता ओळखा!
मित्रांनो, मागील काळात आपण एकजुट करून संप केला आपली एकच मागणी होती विलीनीकरण पण आपण परत एकदा नेतृत्व निवडण्यात अपयशी ठरलो. कामगार चळवळीत बाहेरील नेता निवडला तर एक तर राजकारण होते एक तर निराशा हे आपण उघड्या डोळयांनी पाहिले. कोणत्यातरी पक्षाच्या आमदारावर विश्वास ठेवून त्यांच्या नादी लावून विलीनीकरण सारखी मोठी मागणी मंजूर करण्यासाठी शेकडो कामगारांचे बळी दिले. खरे तर एका भाजप पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे कोणतेही अधिकार नव्हते, त्यांच्या पक्षात त्यांचे वजन नव्हते, पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, ते आजही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहेत त्यांच्या विरोधात जाण्याची त्यांची क्षमता नाही भविष्यात जातील याची किंचितही क्षास्वती नाही. विलिनीकरण मागणीवर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अगोदरच इले्ट्रॉनिक्स मीडियावर स्पष्ट केले आहे की आम्ही उच्च न्यायलयाने जो निर्णय दिला आहे त्याचे पालन करू...असे असताना गोपीचंद पडळकर साहेब यांच्या युनियन कडून १६ मागण्या मंजूर झाल्या आहेत यासाठी तगादा लावला जात आहे ...या मागण्या कोणत्याही ठिकाणी सरकारी कागदावर लेखी स्वरूपात पहायला मिळाल्या नाहीत तसेच या मागण्या भविष्यात मंजूर होतील याची गॅरंटी नाही मग असे असताना परत आपण यांच्या राजकारणाला बळी पडण्याचे का? ही झाली एक बाजू.
दिशाहीन संपाचे नेतृत्व करणारे वकील महाशय यांच्या बाबतीत कोणाला काही सांगण्याची आवश्यकता राहिली नाही त्यांचे सर्व सत्य बाहेर आले आहे.
मित्रांनो संपा दरम्यान वेतनाची हमी मविआ सरकारने चार वर्ष घेतली आहे पगारासाठी दर महिन्याला पैसे देण्याचे कबूल करण्यात आले असे असताना नवीन सरकार मात्र एस.टी.कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत गंभीर दिसत नाही ज्याठिकाणी 400 ते 500 कोटी वेतनासाठी द्यायला हवेत त्याठिकाणी 100 कोटी चा शासन निर्णय काढून कामगारांची थट्टा केली जात आहे. नवीन सरकारकडून एस टी.कामगारांच्या खूप आशा आहेत विलीनीकरण मागणी नवीन सरकार मान्य करून घेणार नाही हे अंतिम सत्य आहे....ज्या ठिकाणी वेतन देण्यासाठी पैशांचा हिशोब लावला जात आहे ते सरकार येणाऱ्या 5 वर्षात एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करेल याचा विचार न केलेलाच बरा.....ही झाली दुसरी बाजू.
वास्तविकता ओळखा मित्रांनो आपल्या वेतनाची तारीख परत चुकायला लागली आहे एक तर वेतन जेमतेम त्यात कर्मचारी कर्जबाजारी वेतन वेळेत झाले नाही तर किती अनर्थ होतात हे आपण पाहिले आहेत. परत आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी आपली आर्थिक बाजू भक्कम करणे गरजेचे आहे त्यासाठी युनियन वाद बाजूला ठेवून ...मागील संपात जी अनियमित वेतनवाढ 5000/4000/2500 ही तफावत दूर करून सेवाज्येष्ठते नुसार वेतन करणे हे महत्वाचे आहे. ही तफावत दुर करुन अधिकृत वेतनवाढ मिळविण्यासाठी आपला वेतन करार करणे आवश्यक आहे सदर करार वेतन आयोगाप्रमाणे झाला तरी काही हरकत नाही पण *आपले वेतन हे नियमित व अधिकृत होणे आवश्यक आहे.*
पडळकर साहेब यांची युनियन असो की अन्य कोणती युनियन यांनी कितीही बोलण्या सरकारशी केल्या तरी *कायदेशीर वेतन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आपल्या Recognised संघटनेची आवश्यकता असते तिला सोबत घेऊन बोलणी केली तरच कामगारांचे प्रश्न योग्य रीतीने व जलद गतीने सोडविले जातील हीच वास्तविकता आहे.*
मित्रानो आपण भावनेच्या जगातून बाहेर येऊन आपला स्वार्थ ओळखून तू तू मैं मैं बंद करून आपला स्वार्थ साधून घ्यावा ...आपण जर परत इतिहासाची पुनरावृत्ती केली तर आपला पदरी परत एकदा निराशा पडेल एवढे निश्चित......यावर अवश्य विचार करावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा