इश्यु व स्टार्ट पद्धत-
प्रथम तिकीट घेऊन मगच प्रवास सुरू करण्याच्या पद्धतीला "इश्यु व स्टार्ट" पद्धती असे म्हणतात. महामंडळाच्या कारभारात या पद्धतीला अत्यंत महत्त्व आहे. या पद्धतीमुळे वाया जाणारे महामंडळाचे उत्पन्न वाचू शकते. कोणतीही गाडी मार्गावर जाण्यापूर्वी प्रथम फलाटावर पंधरा मिनिटे अगोदर लावावी यावेळी गाडीत प्रवाशांचे आरक्षण असेल त्याप्रमाणे त्या सीटवर बसण्यासाठी मार्गदर्शन करावे. त्यांची आगाऊ तिकीट विक्रीची व्हाऊचर तापासून त्यावर वरील नोंदीप्रमाणे प्रवासी त्या त्या सीटवर बसलेले आहेत, प्रवास भाडे बरोबर वसूल केलेले आहे याची खात्री करावी. व्हाऊचर परत करावी. आगाऊ आरक्षण तिकिटा शिवाय प्रवासी गाडीत बसलेले असतील त्यांना ट्रे मधुन त्यांच्या प्रवासाची तिकिटे द्यावीत. गाडीची आसन क्षमता झालेली असल्यास वाहतूक नियंत्रकास सांगावे. वाहतूक नियंत्रक तिकिटांची नंबर बंद करतात व मार्ग पत्रकावर सुरुवातीचे ठिकाणी किती प्रवासी गाडीत आहेत हे मार्ग पत्रकावर नोंद करून गाडी पुढील मार्गावर सोडतात. वाहतूक नियंत्रण नोंदवहीवर त्या गाडीतून गेलेल्या प्रवासी संख्येची नोंद करतील. अशा पद्धतीमुळे वाहकांना अपहार करण्याची संधी मिळत नाही. कोणत्याही प्रवासास विनातिकीट प्रवास करण्याची हिंमत होत नाही. प्रवाशांनाही महामंडळाच्या कामकाजाबाबत आपुलकी वाटते.
सदर पद्धतीचा कटाक्षाने वापर होण्याच्या दृष्टीने वाहतूक नियंत्रक व इतर पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनी दक्ष राहिले पाहिजे.
प्रथम तिकीट घेऊन मगच प्रवास सुरू करण्याच्या पद्धतीला "इश्यु व स्टार्ट" पद्धती असे म्हणतात. महामंडळाच्या कारभारात या पद्धतीला अत्यंत महत्त्व आहे. या पद्धतीमुळे वाया जाणारे महामंडळाचे उत्पन्न वाचू शकते. कोणतीही गाडी मार्गावर जाण्यापूर्वी प्रथम फलाटावर पंधरा मिनिटे अगोदर लावावी यावेळी गाडीत प्रवाशांचे आरक्षण असेल त्याप्रमाणे त्या सीटवर बसण्यासाठी मार्गदर्शन करावे. त्यांची आगाऊ तिकीट विक्रीची व्हाऊचर तापासून त्यावर वरील नोंदीप्रमाणे प्रवासी त्या त्या सीटवर बसलेले आहेत, प्रवास भाडे बरोबर वसूल केलेले आहे याची खात्री करावी. व्हाऊचर परत करावी. आगाऊ आरक्षण तिकिटा शिवाय प्रवासी गाडीत बसलेले असतील त्यांना ट्रे मधुन त्यांच्या प्रवासाची तिकिटे द्यावीत. गाडीची आसन क्षमता झालेली असल्यास वाहतूक नियंत्रकास सांगावे. वाहतूक नियंत्रक तिकिटांची नंबर बंद करतात व मार्ग पत्रकावर सुरुवातीचे ठिकाणी किती प्रवासी गाडीत आहेत हे मार्ग पत्रकावर नोंद करून गाडी पुढील मार्गावर सोडतात. वाहतूक नियंत्रण नोंदवहीवर त्या गाडीतून गेलेल्या प्रवासी संख्येची नोंद करतील. अशा पद्धतीमुळे वाहकांना अपहार करण्याची संधी मिळत नाही. कोणत्याही प्रवासास विनातिकीट प्रवास करण्याची हिंमत होत नाही. प्रवाशांनाही महामंडळाच्या कामकाजाबाबत आपुलकी वाटते.
सदर पद्धतीचा कटाक्षाने वापर होण्याच्या दृष्टीने वाहतूक नियंत्रक व इतर पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनी दक्ष राहिले पाहिजे.
नितिनजी खूपच छान माहीती दिलीत .
उत्तर द्याहटवासर खूपच छान माहिती.
हटवाही स्टँडवरची पद्धत आहे.पण रस्त्यावर व पुढील प्रवासात काय पद्धत राबवावी याबद्दल सुद्धा माहिती द्यावी.