रविवार, १ एप्रिल, २०१८

🚌 *सार्वजनिक प्रमंडळाची उपयुक्तता:* 🚌

🚌
*एस.टी.महामंडळासंबंधी उपयुक्त माहिती संशोधनामधुन समोर आली आहे.-* 

🚌 *सार्वजनिक प्रमंडळाची उपयुक्तता:* 🚌

     👉सार्वजनिक प्रमंडळाची निर्मितीच शासनाकडुन जनकल्याणासाठी जनसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी केलेली असते. प्रामुख्याने दळणवळणाचे आणि आर्थिक व्यवहारांची विकासात्मक दृष्ट्या निगडित असणारे एस.टी.महामंडळ सर्वाधिक उपयुक्त आहे.
  सार्वजनिक प्रमंडळाने सार्वजनिक सेवा विकेंद्रीकरणाचे उद्दिष्ट्य समोर ठेवुन विकासाच्या अनुषंगाने उपयुक्त असते.
जनतेच्या हिताच्या दृष्टीने व दैनंदिन आवश्यकता सार्वजनिक प्रमंडळाद्वारे भागविल्या जातात. विशेषत: एस. टी.महामंडळाची दैनंदिन दळणवळणाची अत्यंत महत्वाची सेवा उपलब्ध करुन देते.

👉  *विधीमंडळाच्या संमतीने सार्वजनिक प्रमंडळाची निर्मिती होते.* *आणि शासनाचे उद्दिष्टे कार्यक्रम प्रत्यक्ष राबविण्यासाठी सार्वजनिक प्रमंडळ अत्यंत उपयुक्त असते.*

  👉लोकशाहीच्या आर्थिक स्वातंत्र्याचे मुल्य शासनाचे नियंत्रणात साध्य करणे शक्य होते. *सार्वजनिक प्रमंडळे स्वायत्त असली तरी अनियंत्रित नसतात.*

 👉 *शासनाने ठरवुन दिलेल्या कायद्यांचे नियमांचे आणि संहिताचे अंतर्गत त्यांना काम करावे लागते.* *त्यामुळे ते जन- कल्याणाचे लोकसेवेचे साधन बनते.*

👉  *केवळ नफा कमविण्यासाठी सेवांची निर्मिती न होता जनसेवा हे उद्दिष्टय असते.*

  👉 *सार्वजनिक क्षेतातील नोकरवर्गांना शासनाच्या संकेतानुसार लोकसेवक म्हणुन कार्य करावे लागते.*

👉 *वस्तु आणि सेवांची निर्मिती जनतेच्या आवश्यक गरजा भागविण्याला अग्रक्रम देण्यातुन निर्माण होतात. सेवा आणि वस्तुंच्या निर्मितीचे मुल्य तिच्या सिमान्त उपयोगितेवर न ठरता जनतेच्या गरजा भागविण्याचे आणि जनतेच्या क्रयशक्तीच्या प्रमाणात ठरते.*

👉 🚌  *सार्वजनिक प्रमंडळे आणि विशेषत: एस.टी.महामंडळ शासन यंत्रणेच्या बाहेरील असल्यामुळे जनसेवेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.*
   
     कल्याणकारी राज्याचे उद्दिष्टे साध्य करण्याचे केंद्र सरकारचे प्रयोजन परिपुर्णता हे राज्याचे उद्दिष्टे ठरते. कल्याणकारी राज्याचा जलद विकासासाठी सार्वजनिक प्रमंडळाची स्थापना महाराष्ट्र राज्यानेही केली आहे. राज्यात विकासाच्या पुर्ततेसाठी अनेक महामंडळे स्थापन केलेली आहेत.
   कोणत्याही जागृत प्रशासनात शासन आपल्या योजना घेऊन लोकांच्या दारी जाणे अभिप्रेत आहे. कारण विकास ही न थांबणारी प्रक्रिया असुन विकासामुळेच लोकशाहीस अर्थ प्राप्त होत असतो. लोकशाहीच्या लोकविस्वस्थ लोकांच्या शासनाने लोकांसाठी रावविलेल्या विकासात्मक योजनांच्या कार्यक्रमांची साधने शासनाकडे अधिक प्रमाणात असतात. जनतंत्राचे काही संकेत असतात. व त्यातुनच शासनास सामान्य प्रशासनाअंतर्गत येणारे प्रशासकिय कार्य पार पाडावी लागतात.
*"जनतेस मात्र काही सेवा व सोयी अशाही आवश्यक वाटतात की ज्या सेवा विक्री होतात अशा सेवा मात्र शासन स्वत: पुरवु शकत नाही. कारण शासन हे 'ना नफा ना तोटा' या तत्वावार चालत असते."*

  👉 *म्हणुनच काही सेवा जनतेस पुरविण्याच्या दृष्टीवरुन शासन विशिष्ट उद्देशाने चालणारी महामंडळे, निगम अशा निमशासकीय स्वायत्त आणि अंगीकृत व्यावसायिक संघटनाची स्थापना करीत असते.*

🚌  *त्यापैकी महत्वाचे महामंडळ एस.टी.महामंडळ होय.*

🙏 *नितिन बागले, चोपडा आगार* 🚌🚌🚌🚌

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा